महागाई, बेरोजगारीपासून ते लाडकी बहीण आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल
गडचिरोली (Gadchiroli) :- विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता अवघे दोन दिवस उरले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान होणार असून, शनिवारी, 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.दरम्यान, आज गडचिरोलीतील वडसा येथे काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत बोलताना त्यांनी पुन्हा एकदा भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र (Narendra Modi) मोदींवर जोरदार हल्लाबोल केला.
ते म्हणाले, “आपले संविधान बलवान आहे, महाराष्ट्र ही दिशादर्शक भूमी आहे. ही संघर्षाची भूमी आहे. संतांनी एकतेचा संदेश दिला. प्रत्येकाला प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे, असे संविधान सांगते.काँग्रेसने मोठमोठ्या संस्था निर्माण केल्या, पण आज उद्योग महाराष्ट्राबाहेर जात आहेत. 10 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक बाहेर गेली. मोदींच्या राजवटीत कोणीही सुरक्षित नाही. आम्ही जिथे जिथे सरकार बनवले तिथे हमीभाव दिले आणि त्याची पूर्तताही केली. छत्तीसगड आणि इतर राज्यांमध्येही हे घडले.
भाजप विरुद्ध आहे. त्याच्याकडे उत्तर नाही. ते भावना भडकावून निवडणुका जिंकतात. जबाबदारीची परंपरा त्यांनी संपवली. असे काही बोलणे आणि जिंकणे शक्य नाही.” अशी जोरदार टीका प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी आपल्या भाषणात केली.