महायुतीचा जागावाटापचा फॉर्म्युल्यावर चर्चा
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर महायुती सरकारने आज पत्रकार परिषद घेतली. उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारने घेतलेल्या वेगवेगळ्या निर्णयांची माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. “शरद पवारांना (Sharad Pawar) आव्हान करतो की, त्यांनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा सांगावा”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. महायुतीचा जागावाटापचा फॉर्म्युला काय असणार? त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘लवकरच सांगू’. “वेगवेगळ्या घटकांनाही दिलासा दिला आहे.
कोतवाल, अंगणवाडी सेविका, आशाताई वर्कर प्रत्येक घटकाला आपण दिलासा दिला. होमगार्डचं मानधन दुप्पट केलं. त्यांच्याही जीवनात परिवर्तन केलं. आगरी, कोळी, गवळी समाज, शिंपी, सोनार, लोहार, आर्यवैश्य, तेली समाज असेल प्रत्येकाचे आपण महामंडळ तयार केलं आहे. त्यांच्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न केला. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून एक लाख तरुणांना उद्योगपती केलं आहे” असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.