शिवरायांचा पुतळा कोसळला ही क्लेशदायी घटना
देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
नौदल दिनानिमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर उभ्यारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेनंतर आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केलं होतं. त्यानंतर आता पुतळा कोसळल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सगळ्या प्रकाराबाबत भाष्य केलं आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे ही दु:खदायक घटना आहे. यावर कोणीही राजकारण करु नये. पुतळा उभारताना राजकोट किल्ल्यावरील वाऱ्यांचे आकलन शिल्पकाराला करता आले नसावे. आता आम्ही नौदलाच्या मदतीने त्याच ठिकाणी नवा पुतळा उभारू असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी दिला
———–
दहीहंडीच्या आनंदावर दुःखाचे विरजण
शॉक लागून दोघांचा मृत्यू
दहीहंडीच्या कार्यक्रमात डीजे वाजवण्यासाठी साऊंडची टेस्टिंग घेणाऱ्या 2 जणांचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना वर्धा जिल्ह्यातील सालोड हिरापूर येथे घडली. या घटनेमुळे दहीहंडीच्या आनंदावर दुःखाचे विरजण पडले आहे. सूरजच्या कुटुंबीयाला सोमवारच्या दहीहंडी कार्यक्रमात डीजे वाजवण्याची सुपारी मिळाली होती. त्यामुळे त्यांनी नव्याने आणलेल्या डीजेची तपासणी करण्यासाठी सेटअप तयार करून विद्युत जोडणी सुरू केली ही. यासाठी त्यांनी विजवाहक तारांमधून वीज घेण्याचा प्रयत्न केला.
———-
बसपाच्या अध्यक्षपदी मायावतींची फेरनिवड
21 वर्षांपासून पदावर
बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मायावती यांची फेरनिवड करण्यात आली आहे बसपाच्या लखनऊ येथे झालेल्या बैठकीत आज, मंगळवारी हा निर्णय घेण्यात आला. मायावती यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेणार नसल्याचे स्पष्ट केल्याच्या एका दिवसानंतर पक्षाच्या केंद्रीय कार्यकारी समितीने त्यांच्या हाती पुन्हा बसपाच्या अध्यक्षपदाची सुत्रे दिली आहेत.
———–
सरकारने काढले ७०० प्राणी मारण्याचे टेंडर
भयानक दुष्काळ
ग्लोबल वार्मिंगचा मोठा फटका जगाला बसत आहे. उष्णता वाढल्यामुळे हिम पर्वत वितळत आहेत. तर, समुद्राचा जलस्तर देखील वाढत आहे. हवामान बदलामुळे आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये दुष्काळास्थिती निर्माण झाली. याची सर्वाधिक झळ ही नामिबिया या देशाला बसली आहे. नामिबियामध्ये भयानक दुष्काळ पडला आहे. इथं लोकांना अन्न खायला मिळत नाही. अशा स्थितीत भूकबळीने लोकांचा मृत्यू होऊ नये यासाठी जंगलातील 700 पेक्षा अधिक प्राणी मारुन जनतेला खायला देण्याचे आदेश नामिबिया सरकारने काढले आहेत.
———-
विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज
महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येचे प्रकरण
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या राजीनाम्याची मागमी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर आज, मंगळवारी कोलकाता पोलिसांनी जबरदस्त लाठीचार्ज केला. पाण्याचा मारा आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडूनही आंदोलक मागे हटत नसल्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज केला. कोलकाता येथील आरजी कार मेडिकल प्रक्षिणार्थी महिला डॉक्टरावरील बलात्कार आणि हत्या प्रकरणी विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले आहे. या आंदोलनाला नबन्ना अभिजन असे नाव दिले असून, विद्यार्थ्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. नबन्ना प्रोटेस्टचे आयोजन रवींद्रभारती विश्वविद्यालयातील एमएचे विद्यार्थी प्रबीर दास, कल्याणी विश्वविद्यालयातील शुभंकर हलदर आणि सयान लाहिडी नावाच्या विद्यार्थ्यांनी बोलावले. आम्हाला राजकारणाशी काही देणे घेणे नाही परंतु ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे
———–
‘LNG’ बसेस बांधणीचा ठराव मंजूर
महामंडळाची सरकारकडे ९७० कोटींची मागणी
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील ५००० डिझेल बसेसचे रूपांतर ‘एलएनजी’ बसेसमध्ये टप्प्याटप्प्याने होणार आहे. द्रवरुप नैसर्गिक वायू इंधनावर धावणाऱ्या या बसेस एसटीच्या जुन्या बसेसच्या चासिसवरच बांधण्यात येणार आहेत. या बसेसच्या बांधणीसाठी प्रत्येक बस मागे १९.४० लाख रुपये खर्च येणार आहे. या संदर्भातील निर्णयाला एसटी महामंडळाने अखेर मंजुरी दिली आहे. त्यासाठी राज्य सरकारकडे निधी देण्याची विनंती देखील करण्यात आली आहे
————
नागपूर विद्यापीठात प्रथमच ‘जेंडर ऑडिट’
आणखी व्यापक उपाययोजना करण्याच्याही सुचना
नागपूर विद्यापीठात पहिल्यांदाच झालेल्या ‘जेंडर ऑडिट’ . कार्यस्थळी लैंगिक शोषण व लिंगभेद अत्याचार विरोधी संरक्षण समितीच्या अध्यक्षा डॉ. शालिनी लिहितकर, सदस्य सचिव डॉ. मंजुषा गडकरी, सदस्य डॉ. प्रविणा खोब्रागडे, डॉ. वंदना धवड, डॉ. राजेंद्र ऊतखेडे, माधुरी साकुळकर, दिपाली मानकर, दिव्या राठोड, अन्नपूर्णा पारधी यांच्या समितीने मंगळवारी हा अहवाल विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डाॅ. प्रशांत बाेकारे यांना हा अहवाल सादर करण्यात केला