त्यांची सुरक्षा सरकारची जबाबदारी!
नागपूर (Nagpur) :- सरसंघचालक मोहन भागवत स्वातंत्र्यदिनी नागपूरच्या संघमुख्यालयात ध्वजारोहण केले. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावर सरसंघचालक मोहन भागवतांनी चिंता व्यक्त केली. शेजारच्या देशात उत्पात होतोय. हिंदूना त्रास दिला जातोय.आपण कधीच दुसऱ्यावर हल्ला केला नाही, दुसऱ्याला अडचणीत मदतच केली..मात्र, बांगलादेशातील हिंदूंवर होत असल्याने भागवतांनी खंत व्यक्त केली.
आज देशाला अभीष्टचिंतन करण्याचा दिवस आहे. केवळ चिंतन करून होत नाही.याच्याकरता मोठा संघर्ष करावा लागला.1857 नंतर 90 वर्षाचा संघर्ष चालला. अनेक प्रकारच्या लोकांनी त्यात सहभागी झाले. आपल्या देशात प्रत्येक कोपऱ्यात स्वातंत्र्य नायक झाले.सामान्य व्यक्ती पण स्वातंत्र्याकरता रस्त्यावर उतरला. अनेकजण जेलमध्ये गेले अनेक अनेकांना अनेकदा कारावास झाला. शक्तिनुरूप प्रत्येकाने सहभाग घेतला.बलिदान करणारा समूह आणि त्याच्यामागे खंबीरपणे उभा राहणारा समाज त्यानंतर आपल्याला स्वतंत्रता मिळाल्याचे मोहन भागवत (Mohan Bhagwat) म्हणाले.