देवेंद्र फडणवीसांनी केला दावा
उदासीनता पसरवणाऱ्यांनी घरी बसावं, असं थेट देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं असून लढणारे मावळे सोबत आले तर पुढच्या ३ महिन्यात पुन्हा सत्ता आणून दाखवतोय, असा दावाही यावेळी त्यांनी व्यक्त केला. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या उदासीनतेच्या विधानावरून ठाकरे गटाने मात्र त्यांना टोला लगावला आहे.देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीच्या भाजप बैठकीत काही उदासीनता पसरवणाऱ्या कार्यकर्त्यांना चांगलंच सुनावलं आहे.
उदासीनता पसरवणाऱ्यांनी घरी बसावं, असं थेट देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं असून लढणारे मावळे सोबत आले तर पुढच्या ३ महिन्यात पुन्हा सत्ता आणून दाखवतोय, असा दावाही यावेळी त्यांनी व्यक्त केला. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या उदासीनतेच्या विधानावरून ठाकरे गटाने मात्र त्यांना टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीतील भाजपच्या बैठकीतून महायुतीवर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. जनतेला खरं कोण आहे आणि खोटं कोण आहे हे कळालं आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीला महायुतीचाच झेंडा फडकणार असल्याचा विश्वास ही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.