सहकाऱ्यांच्या आग्रहानंतर लावली सलाईन
मुंबई (Mumbai) :- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पाच दिवसांनंतर उपोषणा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मनोज जरांगे पाटलांवर रात्री उपचार करण्यात आले. सहकाऱ्यांच्या आग्रहानंतर जरांगे यांना सलाईन लावण्यात आलं. रात्री सलाईन लावण्यात आल्यानंतर सकाळी पुन्हा सलाईन काढण्यात आलं. मात्र सलाईन लावल्याचं आपल्या लक्षात आलं नाही. आता सलाईन लावल्यानंतर उपोषण करण्यात काय अर्थ आहे? असं म्हणत आपण उपोषण मागे घेत (Manoj Jarange Patil) असल्याचं जरांगेंनी जाहीर केलं.
“माझी तब्बेत चांगली म्हणावी लागेल. काल डॉक्टरांनी सलाईन लावलं हे माझ्या लक्षात आलं नाही. लोकांनी रात्री माझे हात-पाय दाबून मला सलाईन लावलं. लोक मला म्हणाले, तुम्हीही हवे आहातं. आरक्षण देखील हवं आहे. लोकांची माया आहे माझ्यावर! उपोषण हे माझं हत्यार आहे. त्याचा मला उपयोग करू द्या, असं मी म्हणालो पण त्यांनी ऐकलं नाही,” असं जरांगे पत्रकार परिषदेत म्हणाले. “हे सलाईन म्हणजे जेवण केल्यासारखे आहे. त्यापेक्षा नाही उपोषण केलं तरी चालतं मी या मताचा मी आहे. हे सलाईन लावत राहणार आहे. त्यापेक्षा मी मग दुपारी उपोषण स्थगित करून दौरे सुरू करीन. महिलांच्या हाताने उपोषण (maratha reservation) स्थगित करीन असं उपोषण करून काहीही फायदा नाही,” असंही जरांगे म्हणाले. “उपोषण स्थगित करून दुसऱ्या कामाला लागण्याचा माझा विचार आहे,” असं जरांगेंनी सांगितलं.