ठाणे-बोरीवली दुहेरी बोगद्याने मुंबईकरांच्या प्रवासाचा वेळ वाचणार
मुंबई (Mumbai):- विधानसभा निवडणूकाच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गोरेगाव नेस्को येथील कार्यक्रमात सुमारे 29,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. यात महत्वाकांक्षी ठाणे ते बोरीवली दुहेरी बोगद्यांच्या कामाचा शुभारंभ होणार आहे. या बोगद्यांमुळे घोडबंदरची वाहतूक कोंडी टळून ठाण्यातून बोरीवलीला अर्ध्या तासांत पोहचता येणार आहे. सीएसएमटी येथील 10 आणि 11 फलाटांच्या लांबी वाढविल्याने लांबपल्ल्याच्या गाड्यांचे डबे वाढणार आहे.त्यामुळे जादा प्रवाशांची सोय होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आपल्या भाषणात सांगितले की, लोकांना माहित आहे एनडीए सरकारच स्थिरता देऊ शकते. तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर मी म्हटले होते की, तिसऱ्या टर्ममध्ये एनडीए सरकार तीनपट वेगाने काम करेल. महाराष्ट्राकडे गौरवशाली इतिहास आहे. महाराष्ट्राकडे सशक्त वर्तमान आहे. महाराष्ट्राकडे समृद्ध भविष्याचे स्वप्न आहे. विकसित भारताच्या निर्माणासाठी महाराष्ट्राची मोठी भूमिका आहे. महाराष्ट्रात उद्योगांची शक्ती आहे. महाराष्ट्रात शेतीची शक्ती आहे. महाराष्ट्राकडे आर्थिक शक्ती आहे. या शक्तीमुळे मुंबई आर्थिक हब बनले आहे, असे मोदी म्हणाले.
‘पावर हाऊस’ बनविणार
महाराष्ट्राला जगातील सर्वांत मोठे आर्थिक पावर हाऊस बनवायचे आहे. गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये बोलताना मोदी म्हणाले, महाराष्ट्रात आणि मुंबईतील 30 हजार कोटींच्या प्रकल्पाच्या लोकापर्णासाठी आपण आलो आहोत. या प्रकल्पामुळे मुंबई आणि परिसरातील कनेक्टिव्हीटी चांगली होईल. रेल्वे आणि रोडच्या योजनाशिवाय महाराष्ट्रातील युवकांच्या कौशल्य योजनाची मोठी योजना सामील आहे. यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. काही आठवड्याआधी केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी वाढवण बंदराला मंजुरी दिली आहे 36 हजार कोटीच्या या प्रकल्पामुळे येथे दहा लाखाहून अधिक रोजगार बनतील, असा विश्वास माँदी यानी व्यक्त केला.
लोकांनी आमच्या तिसऱ्या सरकारचा उत्साहाने स्वागत केले. लोकाना माहिती आहे की, एनडीए सरकारच स्थिरता देऊ शकते. महाराष्ट्राकडे गौरवशाली इतिहास आहे. महाराष्ट्राकडे सशक्त वर्तमान आहे. महाराष्ट्राकडे समृद्ध भविष्याचे स्वप्न आहे. विकसित भारताच्या निर्माणासाठी महाराष्ट्राची मोठी भूमिका आहे. महाराष्ट्रात उद्योगाची शक्ती आहे. महाराष्ट्रात शेतीची शक्ती आहे. महाराष्ट्राकडे आर्थिक शक्ती आहे. या शक्तीमुळे मुंबई आर्थिक हब बनले आहे. याच शक्तीमुळे महाराष्ट्राला जगातील सर्वांत मोठे आर्थिक पावर हाऊस बनवायचे आहे. मुंबईला जगातील बुद्धीवतांची राजधानी बनवण्याचा उद्देश असल्याचे मोदी म्हणाले.
महाराष्ट्र टुरीझममध्ये नंबर वन राज्य बनावे, अशी इच्छा आहे. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे विशाल गडकिल्ले आहेत. कोकणच्या समुद्र किनाऱ्यावर मनमोहक दृष्य आहे. महाराष्ट्र भारतात विकासाची नवीन गाथा लिहिणार आहे, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) त्याचबरोबर राज्य मंत्रिमंडळातील मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते.
विकास प्रकल्पांमुळे मुंबईकरांना मोठा फायदा होणार आहे. त्याच बरोबर मुंबई शहर वेगवान होणार आहे. या विकास प्रकल्पांसाठी 29 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ठाणे-बोरीवली दुहेरी भुयारीमार्ग आहे. या 16 हजार कोटीच्या प्रकल्पाचे यावेळी लोकार्पण करण्यात आले. हा एक द्वीन टनल स्वरूपाचा प्रकल्प असणार आहे.