पुणे (pune)11 जुलै :- श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज आणि श्रीसंत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील पायी वारीत राहुल गांधी (Rahul Gandhi) १४ जुलै रोजी सहभागी होणार आहेत. यंदा पंढरीच्या वारीत राहुल गांधी एक दिवस वारी अनुभवणार आहेत.श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज आणि श्रीसंत तुकाराम महाराज यांची पालखी दरवर्षी पंढरपूरला जाते. पंढरपूरला जाणाऱ्या आषाढी पालखी सोहळ्यात ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ हा उपक्रम राबविला जातो. या वारीत साहित्यिक, विचारवंत, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, कलावंत यांचा सहभाग असतो. या वारीत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे पायी चालले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी वारीचे स्वागत केले आहे.
भारत जोडाे यात्रेच्या वेळी काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशभर दौरा केला होता. त्यानंतर लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधीही यंदा पंढरीच्या वारीत राहुल गांधी एक दिवस वारी अनुभवणार आहेत. राज्यात येत्या तीन-चार महिन्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी हे पंढरीच्या वारीत सहभागी होणार असल्यामुळे त्यांना हजारो वारकरी आणि जनसामान्यांपर्यंत पोहोचता येणार आहे.