अहमदनगर, 9 जुलै:- नगर येथील वैष्णव सेवा भक्त मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे पायी दिंडी सोहळा पंढरपूर आषाडी दिंडीचे प्रस्थान झाले.यंदाच्या वर्षी दिंडीचे हे १३ वे वर्ष आहे.ब्रम्हलीन समर्थ सद्गुरु हरिहर महाराज व ब्रम्हलीन शंकर महाराज जोशी,ब्रम्हलीन गोपाल चैतन्य महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने वैष्णव सेवा भक्त मंडळाच्या वतीने काढण्यात येते.
अहमदनगर शहरात मळीवाडा भागातील कपिलेश्वर महादेव मंदिर येथून दिंडी निघाली.त्यावेळी सुनीलप्रकाश त्रिपाठी,संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक कैलास मोकाटे,राजेंद्र फुलारी,भगवान मोकाटे,भगवान हरबा,ईश्वर सिंग परदेशी, अनंत द्रविड,विजय ईथापे,रावसाहेब भगत,केशव करपे,सुनिल दातरंगे,बबनराव बोरुडे,विनायक खेडकर,सतिष म्हस्के,शरद चाफेकरसह अनेक मान्यवर,वारकरी महिला,पुरुष उपस्थित होते. दिंडी सोहळा नगरहून निघाल्यावर पहिला मुक्काम दहिगाव येथे राहणार आहे व पुढे करमाळा मार्गे पंढरपूरला हा पालखी सोहळा १५ जुलैला पोहचणार आहे.
वैष्णव सेवा भक्त मंडळाच्या पायी दिंडीचे नगरमधून प्रस्थान
