Saturday, June 21, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

आसामच्या पूरस्थितीत थोडी सुधारणा

दिसपूर, 09 जुलै:- आसाममधील पूरस्थितीत थोडी
सुधारणा झाली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार
पावसामुळे 27 जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती.यावर्षी आतापर्यंत पूर, भूस्खलन आणि
अतिवृष्टीमुळे जीव गमावलेल्यांची संख्या 85 वर पोहोचली असून त्यातसोमवारी 6 जणांचा मृत्यूझाला आहे. सध्या आसाममधील स्थितीतथोडीफार सुधारणा झाली आहे, मात्र अजूनही18.80 लाख लोकांना पुराच्या पाण्यात राहावे लागत आहे.ब्रह्मपुत्रासारख्या काही मुख्य नद्या अजूनही धोक्याच्या पातळीच्या वर वाहत आहेत.

आसाममधील सद्यस्थितीबाबत बोलताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, रविवारी पुरामुळेबाधित झालेल्या 22.75 लाख लोकांच्या तुलनेत 27 जिल्ह्यांमध्ये 18.80 लाख लोक बाधित झाले. पुरामुळे धुबरीचे मोठे नुकसान झाले आहे. येथे 4.75 लाख लोकांना पुराच्या पाण्यात राहावे लागत आहे. याशिवाय कचरमध्ये 2.01 लाख आणि बारपेटामध्ये 1.36 लाख लोक बाधित झाले आहेत.पूरग्रस्तांसाठी प्रशासनाने 25 जिल्ह्यांमध्ये 543 मदत शिबिरे आयोजित केली आहेत. या छावण्यांमध्ये 3,45,500 लोक राहत आहेत.

नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (National Disaster Response Force) आणि एसडीआरएफसह (SDRF) विविध एजन्सीद्वारे बाधित भागात बचाव कार्य केले जात आहे. गुवाहाटी येथील प्रादेशिक हवामान केंद्राने सांगितले की,आसाम आणि आसपासच्या राज्यांमध्ये चक्रीवादळाचा धोका आहे.येत्या 25 तासांत अरुणाचल प्रदेश,आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये काही ठिकाणी गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. निमतीघाट, तेजपूर, गुवाहाटी आणि धुबरी येथे ब्रह्मपुत्रा नदी धोक्याच्या चिन्हावरून वाहत आहे. धोक्याचे चिन्ह ओलांडणाऱ्या नद्यांमध्ये बडतीघाट येथील सुबनसिरी, चेनिमारी येथील बुर्हिडीहिंग, शिवसागर येथील दिखाऊ, नांगलामुराघाट येथील दिसांग, धरमतुल येथील कोपिली, बीपी घाट येथील बराक, गोलोकगंज येथील संकोश आणि करीमगंज येथील कुशियारा यांचा समावेश आहे.राज्यातील अनेक भागात रस्ते, पूल आणि इतर पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles