दोन टप्यात होणार 19872 घरकुल पूर्ण
अमरावती : जिल्ह्यात सन २०१६ ते २०२४ दरम्यान ४० हजारांवर घरकुलांची कामे अर्धवट असल्याने ती पूर्ण करण्याकरिता आता जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने स्पेशल ड्राइव्ह केल्या जात आहे. मे महिन्यात पहिल्या टप्प्यामध्ये १ हजार ७७ तर दुसऱ्या टप्प्यात एकाचवेळी ७९५ अशी १८७२ घरकुलांची कामे पूर्ण करण्यात आली आहे. तर उर्वरीत घरकुल लवकरच पूर्ण करण्याचा मानस जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रिती देशमुख यांनी व्यक्त केला. दोन टप्यात १९८७२ घरकुल पूर्ण होणार असल्याची माहिती आहे.
जिल्ह्यात अर्धवट घरकुलांची संख्या अधिक असल्याने याबाबत शासनाकडूनदेखील त्या पूर्ण करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहे. यापूर्वी एकाचदिवशी १४ खातेप्रमुखांनी २८ ग्रामपंचायतींची व्हिजीट करून पाहणी केली होती. सन २०१६-१७ ते २०२३-२०२४ या दरम्यान केंद्रातील ११ हजार १९९ व राज्य शासनाचे ३० हजार २८२ अशी एकूण ४१ हजार ४८३ घरकुलांचे कामे रखडली आहेत. ती पूर्ण करण्याकरिता सीईओ संतोष जोशी यांच्या मार्गदर्शनात व प्रकल्प संचालक प्रिती देशमुख (Preity Deshmukh) यांच्या नेतृत्वामध्ये १३ ते १८ मे त्यानंतर २७ ते ३१ मे या १० दिवसांत ड्राइव्ह घेण्यात आला होता. यामध्ये ६२ ग्रामीण गृहनिर्माण अभियंता, स्थापत्या अभियंता २८ यासह १४ बीडीओ, १४ साहाय्यक बीडीओ आदी शंभरहून अधिक अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. याला लाभार्थ्यांनी प्रतिसाद ५त या पहिल्या पाच दिवसांतच १ हजार ७७ तर दुसऱ्या टप्प्यात ७९५ अशी एकूण १,८७२ घरकुलांची कामे पूर्ण करण्यात आले आहे. पहील्या टप्प्यात दर्यापूर तालुक्यात सर्वाधिक १४६ तर दुसऱ्या टप्प्यात नांदगाव खंडेश्वर तालुक्यात १६२ घरकुल पूर्ण करीत मोहिमेत अव्वल क्रमांक पटकाविला आहे. ज्या तालुक्यात प्रतिसाद नाही त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे प्रकल्प संचालक प्रिती देशमुख म्हणाल्या.