नाशिक:- मानवाने नेहमीच स्वत:च्या विकासासाठी प्राकृतिक संसाधनांचे शोषण केले असून त्याचा परिणाम म्हणून आज आपण पर्यावरणाचा ऱ्हास झाल्याचे पाहत आहोत. या हानीपासून पृथ्वीचा बचाव करण्यासाठी आणि पर्यावरणाच्या रक्षणाच्या प्रति जागृती निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाकडून दरवर्षी विश्व पर्यावरण दिवस आयोजित केला जातो.
सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या आदेशानुसार संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा, संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या विद्यमाने संयुक्त राष्ट्रांची थीम बीट प्लास्टिक पोल्युशन (Theme beat plastic pollution)या विषयाला अनुसरुन सोमेश्वर देवस्थान व धबधबा परिसरात मनपा उपायुक्त विवेक भदाणे व सेक्टर संयोजक गुलाब पंजवाणी यांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरणदिनी एक संदेश देण्यात आला .
सोमेश्वर परिसरात सकाळी ७ ते ११ वाजे दरम्यान स्वच्छता अभियान राबवुन सोमेश्वर मंदिर व धबधबा भागात सुमारे दिडशेवर पिंपळ , कडू लिंब , चिंच , वड आदी वृक्षांची रोपे लवण्यात आली . महापालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील , सेक्टर संयोजक गुलाब पंजवाणी , वासुदेव भोईर , राजन आमले , सोमेश्वर देवस्थान ट्रस्टी तसेच सातपुर , जेलरोड पंचवटी चे मुखी व निरंकारी बांधव ,भगिनी ,सेवादल मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .
संपूर्ण भारतवर्षातील पर्वतीय पर्यटन स्थळांवर विशाल वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. पर्यावरणाचे संकट उभे ठाकले असताना एका बाजुला प्रदूषणापासून मुक्ती मिळविण्यासाठी संपूर्ण मानवजात एका मंचावर एकत्र येत असताना निरंकारी मिशन आपल्या या अभियांच्या माध्यमातून युवापिढीला सकारात्मक ऊर्जा प्रदान करत आहे .जे नि:संदेह उद्याचे उज्ज्वल भविष्य आहे. संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे स्वयंसेवक, सेवादल सदस्य, भक्तगण आणि शहरांतील रहिवाशी एकत्रीतपणे या महाअभियानाने नागरिकांमध्ये जनजागृती होऊन पर्यावरणा बाबत एक चांगला संदेश पोहचला आहे .