Saturday, June 21, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

आम्ही कधीच मिसींग नव्हतो – निवडणूक आयुक्त

‘मिसींग जंटलमन’ टीकेला दिले सडेतोड प्रत्युत्तर

नवी दिल्ली : सोशल मिडीयावर कोडसाळ लोकांनी निवडणूक आयुक्तांना ‘मिसींग जंटलमन’ म्हणत औपरोधिक टीका केली होती. यावर ‘आम्ही कधीच मिसींग नव्हतो,(We were never missing)कायम उपस्थित होतो’ असे सांगत निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलेय. लोकसभा निवडणूक निकालांना एक दिवस शिल्लक असताना आज, सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, आम्ही संपूर्ण निवडणूक कालावधीत कायम उपस्थित होतो, कधीच मिसिंग नव्हतो. निवडणूक आयोगाने देशभरात 64 कोटींहून अधिक लोकांनी मतदान केले असून ही जगातील सर्वात मोठी निवडणूक होती. असे असूनही मतमोजणीत कोणताही फेरफार होण्याची शक्यता मुख्य निवडणूक आयुक्तांनी फेटाळून लावली. तसेच मतमोजणी केंद्रावर गोंधळ घालणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे सांगितले. मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की, भारतीय निवडणुकांची व्यवस्था अशी आहे की निवडणुका झाल्यानंतरही तपासाला वाव असतो. या निवडणुकीत आम्ही निष्पक्षपणे काम केले आणि अनेक पक्षांच्या शिष्टमंडळांनी उपस्थित केलेले सर्व प्रश्न सोडवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत रोख, मोफत वस्तू, ड्रग्ज आणि दारूसह 10 हजार कोटी रुपये जप्त करण्यात आलेत. यापूर्वी 2019 मध्ये 3,500 कोटी रुपये जप्त करण्यात आले होते.’निवडणुकीनंतरही यूपी आणि बंगालमध्ये सुरक्षा दल तैनात राहतील असेही त्यांनी सांगितले.

मतदानानंतर संभाव्य हिंसाचार रोखण्यासाठी पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसेच निवडणुकीदरम्यान आम्ही ‘डीप फेक’ आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे तयार होणारा आर्टिफिशियल कंटेंट या समस्येवर बऱ्याच अंशी नियंत्रण ठेवले. त्याचप्रमाणे आदर्श आचारसंहिता लागू असताना सर्व विकास कामे ठप्प होती. निवडणूक आयोगाने अर्ज प्राप्त झाल्यानंतर 48 तासांत 95 ते 98 टक्के प्रकल्पांना परवानगी दिल्याचे ते म्हणाले.

राजीव कुमार म्हणाले की, यंदाच्या निवडणुकीत केवळ 39 ठिकाणी फेरमतदान झाले. या निवडणुकीसाठी सुमारे 4 लाख वाहने, 135 विशेष गाड्या आणि 1,692 उड्डाणे वापरली गेली. गेल्या निवडणुकीत 2019 मध्ये 540 ठिकाणी फेरमतदान झाले होते. त्या तुलनेत यावेळी फक्त 39 ठिकाणी फेर मतदान झाले. जम्मू आणि काश्मीरमध्ये गेल्या 40 वर्षांतील सर्वाधिक मतदान झाले – एकूण 58.58 टक्के आणि खोऱ्यात 51.05 टक्के मतदान झाल्याचे राजीव कुमार यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles