Saturday, June 21, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

Blind: The car will go away : आणि नरेंद्र मोदींची सत्ता जाणार,

एनडीएला ३५० ते ४०० च्या आसपास जागा

लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास आता काही तासांचा अवधी उरला आहे. दरम्यान, सातव्या टप्प्यातील मतदान आटोपल्यानंतर प्रसिद्ध झालेल्या विविध संस्थांच्या एक्झिट पोलमधून केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएला ३५० ते ४०० च्या आसपास जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, एक्झिट पोल आल्यापासून काँग्रेससह इंडिया आघाडीमधील घटक पक्षांचे नेते त्यावर जोरदार टीका करत आहेत. दरम्यान, एकेकाळी भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटानेही एक्झिट पोलवर टीका केली आहे. शिवसेना ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या आजच्या अग्रलेखामधून एक्झिट पोलवर जोरदार टीका करण्यात आली आहे.

तसेच ४ जून रोजी हुकूमशाहीचा अंध:कार दूर होणार आणि नरेंद्र मोदींची सत्ता जाणार,(Darkness will disappear and Narendra Modi will come to power)असा दावा सामनाच्या अग्रलेखामधून करण्यात आला आहे सामनाच्या आजच्या अग्रलेखात म्हटलं आहे की, सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान पूर्ण होण्याआधी टीव्ही वाहिन्यांनी लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर केले. तसेच तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपदाची शपथ घेतील, हे सुद्धा त्यांनी सांगूव टाकले आहे. काही राज्यातील मतदानाची पूर्ण आकडेवारी समोर आलेली नाही. त्यामुळे या राज्यात निकाल काय लागेल, याचं भविष्य कुणीच सांगू शकत नाही. मात्र सगळ्या मतदानाची सारासार माहिती न घेता एक्झिट पोलवाल्या कॉर्पोरेट कंपन्यांनी पुन्हा एकदा मोदीच येत आहेत आणि भाजपाला आणि त्यांच्या आघाडीस ३५० पेक्षा जास्त जागा मिळतील, असे बिनधास्त ठोकून दिले.

भाजपाला ३५० जागा मिळाव्यात असे कोणते महान कार्य असे कोणते महान कर्तृत्व या लोकांनी गाजवलं आहे, असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे. ४ जून रोजी मतमोजणी होईल आणि हुकूमशाहूचा अंध:कार दूर होईल. मोदींनी ध्यान केले आणि सूर्याला शांत केले, असे भाजपाला शांत केले, असे भाजपवाले सांगतात. मोदी यांनी ध्यान केले तरी जनतेचा उसळलेला उद्रेक ते शांत करू शकलेले नाही. त्यामुळे भाजपाचा पराभव होणारच आहे. भाजपा २२५ च्या वर जात नाही. तर इंडिया आघाडी २९५ ते ३१० जागा जिंकून सरकार स्थापन करेल. एक्झिट पोल हे गुवाहाटीमध्ये कापलेल्या रेड्यांसारखा आहे. त्यामुळे खरा निकाल बदलणार नाही. मोदी है तो इंडिया आघाडीचा विजय १०० टक्के मुमकीन है, मोदी जात आहेत, हाच ४ जूनचा खरा निकाल आहे, असा दावाही सामनाच्या अग्रलेखामधून करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles