अमरावती: बाजारपेठेत न जाता ऑनलाइन खरेदीकडे दिवसेंदिवस लोकांचा कल वाढू लागला आहे. बँडेड वस्तूही घरपोच, तेही अगदी सवलतीच्या दरात सहज उपलब्ध होत असल्याने याचा विपरीत परिणाम स्थानिक बाजारपेठेवर होत असल्याचे पाहावयास मिळत आहे.अमरावती शहराचे उदाहरण घ्यावयाचे झाल्यास या शहरात जवळपास दररोज तीन ते चार लाख रुपयांच्यावर ऑनलाइन खरेदीचे व्यवहार कॉल सेंटरवरून होतात. महिन्याकाठी खरेदी लाखोंच्या घरात जाते आहे. त्याचा सरळ-सरळ फटका स्थानिक बाजारपेठेला बसत आहे. शहरात विविध व्यापारी संकुलांमधून मोठमोठ्या शोरुमच्या माध्यमातून किराणा, इलेक्ट्रॉनिक्स, कपडा, भांड्याची दुकाने थाटून लाखो रुपये भांडवल गुंतवून थाटलेली ही दुकाने शोभेची वस्तू बनली आहेत. या दुकानात ग्राहकांचा पत्ताच नाही, अशी स्थिती निर्माण झाली असतानाच कुरिअर कंपन्यांच्या माध्यमातून या ऑनलाइन शॉपिंग सेवा देणाऱ्या कंपन्यांनी अगदी किराणा मालापासून ते गृहोपयोगी, लहानातल्या लहान वस्तूंपासून ते मोठ्या वस्तू पुरविण्याची व्यवस्था केल्याने आता स्थानिक दुकानदारांना ग्राहकांची वाट पाहावी लागते.
शहरात ऑनलाइन शॉपिंग सेंट” ज्या माध्यमातून अनेक वस्तू कमी किमतीत मिळत असल्याने आमच्या व्यवहारावरत्याचा मोठा परिणाम झाला आहे. गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून नोकर भरती नाही. कुठे रोजगार नाही. पोटापाण्यासाठी काहीतरी करावे.म्हणून गावाकडील जमीन विकून येथे मार्केटमध्ये दुकाने भाड्याने घेऊन बसतोय, परंतु ऑनलाईन खरेदीमुळे आम्हाला दुकानात ग्राहकाची वाट पाहतच बसावे लागत असल्याच्या प्रतिक्रिया स्थानिक दुकानदारांनी दिल्या.
दुकानदार बेरोजगार होण्याची शक्यता
ऑनलाइन खरेदीमुळे स्थानिक बाजारपेठेत मंदी आली असून विविध कंपन्या ऑनलाइन मार्केटिंगमध्ये स्पर्धा करीत आहेत. परिणामी स्थानिक बाजार- पेठेत दुकान थाटून बसलेल्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.