चंद्रपूर 9 जुलै:- चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपुरच्या पेट्रोल बॉम्ब प्रकरणी अद्यापही कोणालाच अटक करण्यात आलेली नाही. दरम्यान तपासासाठी ६ पथके गठीत करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलीणबल्लारपूर येथील स्थानिक गांधी चौकात मोठ्या वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या कापड दुकानात अज्ञात व्यक्तींद्वारे फेकलेल्या पेट्रोलच्या भरलेल्या बाटलीला आग लाऊन फेकून हल्ला करण्याची घटना रविवारी सकाळी साडे दहा वाजता घडली होती. यात दुकानाच्या नोकराच्या पायाला किरकोळ जखम झाली होती. सदर घटनेनंतर ३ हल्लेखोर पळून गेले. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज तपासून त्या दिशेने तपास सुरू केला असून तपासाला वेग आला आहे. पोलिसांनी तपासासाठी ६ पथके गठीत केलेली असून बल्लारपूर व आसपास आरोपींचा शोध घेतला जात आहे.सदर प्रकरण एकतर्फी प्रेमातून असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. बल्लारपूर पोलिस आरोपीचा शोध घेत आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.