Saturday, June 21, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

41 जणांचा मृत्यू तर 400 बेपत्ता | lokvahini News | लोकवाहिनी | Marathi News

41 जणांचा मृत्यू तर 400 बेपत्ता

केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन

केरळमधील वायनाडमध्ये मुसळधार पावसामुळे सोमवारी रात्री उशिरा चार वेगवेगळ्या ठिकाणी भूस्खलन झाले. यामध्ये 4 गावे वाहून गेली. घरे, पूल, रस्ते आणि वाहनेही वाहून गेली. आतापर्यंत 41 जणांचा मृत्यू झाला आहे. 70 रूग्णालयात आहेत, तर 400 हून अधिक लोक बेपत्ता आहेत. ही घटना रात्री उशिरा 2 वाजता घडली.बचावकार्यासाठी एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या टीम घटनास्थळी हजर आहेत. कन्नूरमधील 225 लष्करी जवानांना वायनाडला पाठवण्यात आले आहे. यामध्ये वैद्यकीय पथकाचाही समावेश आहे. याशिवाय हवाई दलाचे दोन हेलिकॉप्टरही बचाव कार्यात गुंतले आहेत.वायनाडमधील मुंडक्काई, चुरमाला, अट्टामाला आणि नूलपुझा या चार गावांमध्ये भूस्खलन झाले आहे. पाच वर्षांपूर्वी 2019 मध्ये याच गावात दरड कोसळली होती, ज्यामध्ये 17 लोकांचा मृत्यू झाला होता. 5 जणांचा शोध लागला नव्हता. 52 घरे उद्ध्वस्त झाली होती.वायनाड व्यतिरिक्त हवामान खात्याने आज कोझिकोड, मलप्पुरम आणि कासारगोडमध्येही पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. म्हणजेच आजही येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे बचावकार्यात अडचणी येऊ शकतात.

———
यशश्रीच्या हत्येची दाऊदकडून कबुली

चेहरा जनावरांनी विद्रुप केल्याचा संशय

यशश्री शिंदेच्या हत्येची कबुली आरोपी दाऊद शेखने दिल्याची माहिती उरण पोलिसांनी दिली आहे. मंगळवारी या हत्येतील मुख्य आरोपी असलेल्या दाऊदला कर्नाटकातून अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला नवी मुंबईमध्ये आणण्यात आले. त्याची प्राथमिक चौकशी केल्यानंतर उरण प्रकरणातील आरोपी दाऊदने यशश्रीची हत्या केल्याची कबुली दिली आहे.

———

लालपरीचे चाक थांबणार
एसटी कर्मचारी पुन्हा संपावर
राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाणार आहेत. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आपल्या मागण्यांसाठी संप पुकारला आहे. येत्या 9 ऑगस्ट पासून एसटी महामंडळातील १३ संघटनांनी संप पुकारला आहे. यामुळे राज्यात लालपरीची चाके थांबणार की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावे या प्रमुख मागण्यांसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी हा संप पुकारला आहे.

 

———-
खेळताना दोराचा लागला फास

7 वर्षाच्या मुलीचा झाला मृत्यू

लपाछपीचा खेळ खेळत असताना आनंदाचे क्षण अचानक दु:खात बदलले. गोवंडीतील शिवाजीनगरमध्ये एका 7 वर्षाच्या मुलीच्या गळ्याला फास लागला. इतर खेळणाऱ्या मुलांच्या लक्षात ही बाब येईपर्यंत तिचा मृत्यू झाला.मुंबईतील गोवंडी येथील शिवाजीनगरमध्ये एक हृदय पिळवटणारी घटना समोर आली आहे. भावडांसोबत खेळत असताना एका 7 वर्षांच्या मुलीला दोरीचा फास लागला. भावडांना ही बाब लक्षात येईपर्यंत उशीर झाला. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर शेजाऱ्यांनी घरात धाव घेतली. तिला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. पण तोपर्यंत तिची प्राणज्योत मालवली होती. घटनेवेळी कोणीही वडीलधारी मंडळी घरात नव्हती. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. थोड्यावेळापूर्वी आपल्याशी दंगा करणारी बहिण गेल्याने भावडांना मोठा धक्का बसला.

——–
कायमस्वरूपी वैद्यकीय जामीन

नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. मागच्या दोन-तीन वर्षात नवाब मलिक यांच्यावर काही आरोप झाले, त्यामुळे ते तुरुंगात होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. सुप्रीम कोर्टाने नवाब मलिक यांना कायमस्वरूपी वैद्यकीय जामीन दिला आहे. हायकोर्ट निकाल देईपर्यंत नवाब मलिक यांचा वैद्यकीय जामीन कायम राहणार आहे. म्हणजे नवाब मलिक आता जेल बाहेरच राहणार आहेत. आज ईडीच्या वकिलांनीही याबाबत आम्हाला कोणतीही शंका नसल्याचे सुप्रीम कोर्टात स्पष्ट केले.

——-
स्मिता वाघ यांच्याकडे संसदेत मोठी जबाबदारी
या गटाचे करणार नेतृत्व
खासदार म्हणून पहिल्यांदाच निवडून आलेल्या जळगावच्या खासदार स्मिता वाघ यांच्याकडे संसदेत मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. लोकसभेत खासदारांना आपले विषय नीट मांडता येत नाहीत. त्यामुळे अनेक खासदार नाराज होत असतात. प्रामुख्याने नवोदित महिला खासदारांना आपले विषय मांडण्यास अडचणी निर्माण होत असतात. त्यामुळेच पक्ष नेतृत्वाने स्मिता वाघ यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपविली आहे. स्मिता वाघ यांच्याकडे लोकसभेतील 12 महिला खासदारांपैकी पक्षाने ‘प्रतोद’ म्हणजेच व्हीप म्हणून नियुक्ती केली आहे.
———-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles