दिल्लीतील IAS कोचिंगमध्ये 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
मुसळधार पावसामुळे तळघर पाण्याने भरले
दिल्लीतील मुसळधार पावसामुळे जुने राजेंद्र नगर येथील राऊस आयएएस स्टडी सर्कलच्या तळघरात पाणी साचले. यामध्ये तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, शनिवारी सायंकाळी पाणी साचल्यानंतर तळघरात बांधलेल्या ग्रंथालयात अनेक विद्यार्थी अडकले. यानंतर अग्निशमन दल आणि एनडीआरएफला पाचारण करण्यात आले. रात्री उशिरा ते सकाळ दरम्यान दोन विद्यार्थिनी आणि एका मुलाचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. एनडीआरएफने सांगितले की, 14 विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. अंतिम फेरीचा शोध सुरू आहे. अपघातानंतर विद्यार्थ्यांनी रात्री उशिरापासून एमसीडीविरोधात निदर्शने केली. पोलिसांनी सांगितले की, 2 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
—————
सीपी राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल
हरीभाऊ बागडे राजस्थानच्या राज्यपालपदी
महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल रमेश बैस यांच्या जागी झारखंडचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे २४ वे राज्यपाल आहेत. तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते हरीभाऊ बागडेंची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अनेक राज्यांमध्ये नवीन राज्यपालांच्या नियुक्त्या केल्या आहेत.शनिवारी रात्री उशिरा राष्ट्रपती भवनाकडून या संदर्भातील पत्रक जारी करण्यात आलं. या परिपत्रकामध्ये एकूण १० राज्यांमधील राज्यपालांच्या बदल्या आणि फेरनियुक्त्या करण्यात आल्या आहेत. सदर नियुक्त्या या पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून लागू होतील, असंही सांगण्यात आलं आहे.
—————
विधान परिषदेतील 11 नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी
मुंडे, खोत, फुके, विटेकर, नार्वेकर, तुमाने, सातव, गवळींनी घेतली शपथ
विधान परिषदेतील 11 नवनिर्वाचित सदस्यांचा आज शपथविधी झाला आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सदस्यांना शपथ दिली आहे. सकाळी विधानपरिषदेच्या विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात हा शपथविधी पार पडला आहे. यात पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, परिणय फुके,
सदाभाऊ खोत, भावना गवळी, कृपाल तुमाने, शिवाजी गर्जे, राजेश विटेकर, प्रज्ञा सातव, मिलिंद नार्वेकर यांचा समावेश आहे.
भंडारा जिल्ह्याला पावसाने काढले झोडपून
हवामान विभागाने केला ऑरेंज अलर्ट जारी
भंडारा जिल्ह्याला हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. सर्वत्र पावसाचे आगमन झाले असुन जिल्ह्यातील नदी नाले ओसंडून वाहत आहेत. जिल्ह्यातील जीवनदायी समजली जाणारी वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे गोसेखुर्द धरणाचे 33 पैकी 27 दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले असुन त्यातून 3051.75 क्युमेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
इटीयाडोह धरण 100% भरलेजिल्हाधिकाऱ्यांनी केले जलपूजन
गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटीयाडोह धरण 100% भरताच जिल्हाधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यां सोबत इटीयाडोह धरणावर जाऊन जलपूजन केले आहे. विशेष बाब म्हणजे इटीयाडोह धरण 100% भरले तर जिल्ह्यातील किमान पावसाने हजेरी लावली अशी समज असते त्यामुळे शेतकऱ्यांना देखील आनंद होत आहे. दुपारकडे 500 हेक्टरच्या वर गोंदिया भंडारा जिल्ह्यासह गडचिरोली जिल्ह्यातील शेतजमिनीला या धरणाचे पाणी दिले जातं असून दर वर्षी धरण भरताच जिल्हाधिकारी या धरणावर येऊन जलपूजन करतात हे विशेष.