कोण लढणार अन् कोण माघार घेणार?
विधान परिषद निवडणुकीत (Maharashtra Legislative Council Election) 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असल्याने चुरस वाढली आहे. त्यामुळे कोणता 12 वा खेळाडू माघार घेणार याची चर्चा रंगली आहे. विधान परिषद निवडणुकीत महायुती आपला उमेदवार मागे घेणार नसल्याने महाविकास आघाडी कोणती भूमिका घेणार? याची चर्चा रंगली आहे. आज (5 जुलै) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत दुपारी तीनपर्यंत आहे. त्यामुळे आता 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात राहणार की ऐनवेळी मिलिंद नार्वेकर माघार घेणार? याचीही उत्सुकता आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर आणि त्यानंतर विधानपरिषद निवडणुकीत शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत दोन जागा जिंकून उद्धव ठाकरेंनी मोठा डाव खेळला आहे. महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या 11 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मिलिंद नार्वेकर यांना 12वे उमेदवार म्हणून रिंगणात उतरवलं आहे. मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंचे ‘मॅन फ्रायडे’ मानले जातात. मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांच्या उमेदवारीमुळे महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता बळावली आहे. नार्वेकर हे उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तीयांपैकी एक आहेत