Friday, June 20, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

1 कोटी बांगलादेशी भारतात येणार

आश्रय देण्याचं भाजपा नेत्याचं आवाहन

बांगलादेशमधील राजकीय परिस्थिती दिवसोंदिवस चिघळत असून भारतामध्येही (India) या गोंधळामुळे टेन्शन वाढल्याचं चित्र दिसत आहे. सोमवारी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी तडकाफडकी राजीनामा देऊन भारतात आश्रय घेतल्यानंतर बांगलादेशमध्ये सरकार स्थापनेचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र असं असतानाच दुसरीकडे महिन्याभराहून अधिक काळापासून सुरु असलेल्या हिंसाचारामुळे बांगलादेशमध्ये फारच स्फोटक स्थिती निर्माण झाली आहे. बांगलादेशमधील (Bangladesh) हिंसाचारामुळे पुढील काही दिवसांमध्ये या देशातून भारतामध्ये तब्बल 1 कोटी हिंदू दाखल होती अशी शक्यता पश्चिम बांगालमधील भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्याने व्यक्त केली आहे.

पश्चिम बांगालमधील विरोधी पक्ष नेते सुवेंदू अधिकारी यांनी पाश्चिम बांगालमध्ये पुढील काही दिवसांत एक कोटी स्थलांतरित हिंदू बांगलादेशमधून दाखल होईल अशी शक्यता व्यक्त केली आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना सुवेंदू अधिकारी यांनी, पश्चिम बांगलामधील जनतेनं एक कोटी हिंदू स्थलांतरितांसाठी तयार रहावं असं म्हटलं आहे. “बांगलादेशमध्ये हिंदूंची हत्या केली जात आहे. रंगपूर नगरपरिषदेमधील नगरसेवक हरधन नायक यांची हत्या करण्यात आली आहे. सिराजगंजमध्ये 13 पोलिसांची हत्या करण्यात आली आहे. या 13 पैकी 9 पोलीस हिंदू होते,” असं सुवेंदू अधिकारी यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles